श्रीमत् शंकराचार्यकृत ‘मानसपूजे' चा कवी विनायककृत अनुवाद
चराचरी तू, आवाहन ये काय तुझ्या कामी ?
सकलाधारा, द्यावे तुजला काय आसना मी ?।
निर्मल जो त्या, केले ठरती अर्घ्यपाद्य वाया,
सकलाधारा, द्यावे तुजला काय आसना मी ?।
निर्मल जो त्या, केले ठरती अर्घ्यपाद्य वाया,
कर वाहेना, आचमन तुला शुद्धाला द्याया ॥१॥
घालू कैसे, तुला निर्मला देवा!स्नानाते?
विश्वोदर तू, तुला वहावा पट कवण्या हाते ?।
निरालंब तू,उपवीताचे महत्त्व तुज नाही,
नसे वासना, फुले सुवासिक निष्फल त्या ठायी ॥२॥
विश्वोदर तू, तुला वहावा पट कवण्या हाते ?।
निरालंब तू,उपवीताचे महत्त्व तुज नाही,
नसे वासना, फुले सुवासिक निष्फल त्या ठायी ॥२॥
गंधाची थोरवी, कोणती नसे लेप ज्याला,
स्वता रम्य तू, फिकी तुजपुढे पडे रत्नमाला।
सदा तृप्त तू, नैवेद्याची काय तुला वाणे,
विभो! तुष्ट तुज, कसे करावे म्या तांबूलाने ? ॥३॥
स्वता रम्य तू, फिकी तुजपुढे पडे रत्नमाला।
सदा तृप्त तू, नैवेद्याची काय तुला वाणे,
विभो! तुष्ट तुज, कसे करावे म्या तांबूलाने ? ॥३॥
नसे अनंता, प्रदक्षिणेचे बल माझ्या ठायी,
अभिन्न तू मी, मग कवणाच्या लागावे पायी?।
तुजला स्तविता, हात टेकिले जेथे वेदांनी,
कशी टिकावी, तेथे वाणी मग बापुडवाणी ? ॥४॥
अभिन्न तू मी, मग कवणाच्या लागावे पायी?।
तुजला स्तविता, हात टेकिले जेथे वेदांनी,
कशी टिकावी, तेथे वाणी मग बापुडवाणी ? ॥४॥
स्वयंप्रकाशी, काय त्यापुढे नीरांजनज्योती ?
विसर्जन तुला कोठे ? विश्वे नांदविसी पोटी ॥५॥
विसर्जन तुला कोठे ? विश्वे नांदविसी पोटी ॥५॥
कळून सारे, सजलो देवा! तुझ्या पूजनासी,
भय न लेकरा, वाटे जाया निजजनकापाशी
चुकले मुकले, शब्द मुलाचे गोडच जनकाते
बालिश लीला, बघून त्याच्या मनी हर्ष दाटे ॥६॥
भय न लेकरा, वाटे जाया निजजनकापाशी
चुकले मुकले, शब्द मुलाचे गोडच जनकाते
बालिश लीला, बघून त्याच्या मनी हर्ष दाटे ॥६॥
अजाण मी लेकरू, तुजकडे जनकाचे नाते,
तव सेवेचा, देवा! ओढा असे मात्र माते।
येईल तैशी, करतो सेवा गोड करूनि घ्यावी,
पुण्यपदाची जोड, वत्सला! विनायका द्यावी ॥७॥
तव सेवेचा, देवा! ओढा असे मात्र माते।
येईल तैशी, करतो सेवा गोड करूनि घ्यावी,
पुण्यपदाची जोड, वत्सला! विनायका द्यावी ॥७॥
'विनायकांची कविता' या चित्रशाळेने १९५५ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात ती आहे. संपादन प्रा. भ. श्री पंडित यांचे आहे.
माझ्या आजी-आजोबांना ही मानसपूजा अतिशय प्रिय होती. ते स्वत: तर म्हणायचेच आणि आम्हां मुलांकडूनही म्हणून घ्यायचे. त्यांच्या आवाजात ऐकल्यामुळे व ह्या काव्यातील उपजत माधुर्यामुळे ही मानसपूजा सदैव स्मरणात राहील.

